अहमदनगर जिल्हा परिषद अधिकारी अॅन्टी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडला !
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
by HRS News Marathi
नगर( प्रतिनिधी):- मिळालेल्या माहितीनुसार नगर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचा अधिकारी नगर अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडला आहे. पुढील कारवाई सुरू आहे... क्रमशः
अहिल्यानगर (हेमंत साठे):- जिल्ह्यातील नगर तालुक्यात पिंपळगाव कवडा नावाचे एक छोटेसे गाव आहे. आज जरी नगर तालुक्यात असला तरी पूर्वी हा गाव पारनेर परगण्यात होता.या गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लागला आहे. गावात ठिक ठिकाणी ऐतिहासिक खुणा नजरेस पडतात. याच गावच्या प्रवेश द्वारावर म्हणजे वेशीवर एक शिलालेख कोरलेला आहे. वेशीला रंग दिलेला असला तरी शिलालेख वाचता येतो. त्याचे वाचन कामरगावचे इतिहास अभ्यासक श्री सतीश भीमराव सोनवणे यांनी केले. ते असे १.|| शके १७०६ क्रोधी नाम संवछरे|| २.||माघ वद्य त्रयोदसी ते दीवसे भ|| ३.|| बहेरो अनंत जागीरदार जोसी कुळ ४.|| कर्णी मौ पिपळगाव कवडा पा| पार ५.|| नेर लागवाड रुपय १००१ शिलालेखाचा अर्थ- शालिवाहन शकाच्या १७०६ व्या वर्षी क्रोधी नावाच्या संवत्सरात माघ वद्य त्रयोदशीला बहिरो अनंत जहागिरदार यांनी मौजे पिंपळ गाव कवडा परगणे पारनेर येथे १००१ रुपये खर्च करून वेशीचे बांधकाम केले. मिती - शके १७०६, माघ वद्य त्रयोदशी, वार सोमवार, पिले जंत्री नुसार इंग्रजी तारीख - ०७ फेब्रुवारी १७८५ शिलालेखाची लिपी - खोदीव स्वरुपाचा हा शिलालेख बाळबोध देवनागरी लिपीत आ...
(Advrt) ######################################### नारायणडोह प्रतिनिधी (रफिक शेख):- गुढीपाडव्यानिमित्त शहरी भागात हल्ली शोभायात्रा निघतात मात्र ग्रामीण भागात आजही कावड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते श्री चांगदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नारायण डोह गावात तर शेकडो वर्षांपासून गुढीपाडव्याच पैठण धरणातलं पाणी कावडीने आणून देवाला वाहीले जाते. तब्बल 110 किलोमीटरच्या पायी कावड यात्रेचे पथ्यही कठोर असतात. तळपत्या उन्हात अनवाणी पायांनी या कावडी अवघ्या तीन दिवसात पैठण वरून नारायणडोहला पोहोचतात. या कावड यात्रे दिवशी पोहोचताच ग्रामस्थ त्यांचे यथोचित स्वागत करतात. नंतर गंगाजलाने श्री चांगदेव महाराजांना स्नान घातले जाते.देवाच्या अभिषेकानंतर मंदिरात समोरच गुरुजींकडून सामनिक पंचांग वाचन होऊन पाऊस मानाचा अंदाज वर्तवला जातो.तसेच पाडव्याच्या मुहूर्तावरच साल गाड्यांची बिदाई हि निश्चित होते अशी ही शेकडो वर्षांची परंपरा ग्राम संस्कृती नारायणडोहो गावाने आजही अविरतपणे सुरू ठेवली आहे. भारतीय नववर्षारंभ दिवस म्हणजे चैत्र शु || प्रतिपदा .साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त. प्रस्तुत दिवस म्हणजे न...
नगर (हेमंत साठे):- तालुक्यातील अकोळनेर येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरीनाम सप्ताहात वारकरी बनून आलेल्या जालना जिल्ह्यातील महिला व पुरुषांच्या टोळीने चांगलाच उच्छाद घालत अनेक महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्यावर तेथे उपस्थित नागरिकांच्या मदतीने १८ जणांच्या टोळीला पोलीस पथकाने पकडले. अकोळनेर येथे १६ एप्रिल पासून हा सोहळा मोठ्या स्वरुपात सुरु होता. २३ एप्रिल रोजी या सोहळ्याची सांगता होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी जिल्हाभरातील भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला होता. दुपारी १२ च्या सुमारास गाथा पारायणाची सांगता झाली. त्यानंतर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. या गर्दीत अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोऱ्या होऊ लागल्या, काही वेळात चोऱ्यांच्या या घटना निदर्शनास येवू लागल्या. त्यामुळे तेथे उपस्थित स्वयंसेवक सतर्क झाले. त्यांनी या गर्दीत चोरट्यांची शोध मोहीम सुरु केली. स्थानिक नागरिक आणि काही भाविकही त्यांना मदत करू लागले. काही वेळातच ३-४ महि...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा