पोस्ट्स

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

इमेज
  अहिल्यानगर (प्रतिनिधी) :  कामरगाव ता. अहिल्यानगर परिसरात एका बंद घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचे दागिने चोरून लंपास केल्याची घटना घडली आहे.  सदर चोरीच्या घटनेत खरेदी करतेवेळेची अंदाजे किंमत रु ८६०००/-  परंतु सदयस्थितीतील मार्केट भावाप्रमाणे अंदाजे किंमत ६०००००/ (सहा लाख रुपये) किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे असे मिळालेल्या माहितीनुसार समजते. याबाबत फिर्यादी प्राध्यापक डॉ.अशोक विठ्ठल ठोकळ (वय ४९, रा. मुलानवस्ती, कामरगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की. कामरगाव येथील प्राध्यापक डॉ. अशोक ठोकळ एका नामांकित महाविदयालयात कार्यरत आहेत. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रात सण झाल्यानंतर त्यांच्या पत्नी यांनी दागिने घरातील कपाटाखाली ठेवले होते. परंतु १० फेब्रुवारी रोजी घरात झाडलोट करताना दागिने नसल्याचे आढळले. त्यांनी डॉ.अशोक ठोकळ यांना फोनद्वारे सदर घटना कळवली. त्यानंतर त्यान...

अहिल्यानगरच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा 'स्नेहबंध' तर्फे सत्कार

इमेज
  (अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा शाल व वृक्ष देऊन सत्कार करताना 'स्नेहबंध'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.) अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी महापौर सौ. गाडे यांना शाल व वृक्ष देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर अधिक स्वच्छ, हरित व प्रगत शहर घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाच्या माध्यमातून हा सत्कार अधिक अर्थपूर्ण ठरला. महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकाभिमुख उपक्रम, विकासकामे व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी सांगितले. ********************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास...

माझी एक आठवण...महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व स्व.अजितदादांबद्दल...🙏

इमेज
         बारामती येथे २२ ते २४ डिसेंबर २०१२ या कालावधीत ९३ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. हे संमेलन प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी बारामतीची रंगीत विद्युत रोषणाई आणि भव्य तयारी लक्षवेधी ठरली होती. यासाठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष त्यावेळी नुकतेच परत सिंचन घोट्याळ्यात आरोप झाल्यावर राजीनामा दिल्यानंतर निर्दोष सुटल्यावर ७ डिसेंबर ला परत नव्याने  उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार हे होते. तर उदघाटक म्हणून केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब हे होते व प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे होते . साहित्य, नाट्य याची मला आवड असल्याने या कार्यक्रमासाठी जायचे असे  मी व आमचे मित्र रमेश पवार सर, (बीड ) यांनी ठरवले . २२ डिसेंबरला शनिवार होता, शाळा सुटल्यावर नगर एसटी बस स्टँडवरुन एसटीने डायरेक्ट रात्रीचा प्रवास करून २३ डिसेंबरला रविवारी  बारामती गाठले. पहाटेच एसटी स्टँडवरच सर्व प्रातःविधी, अंघोळ वगैरे उरकून बारामती येथील मोरोपंत मंडपात नाटय संमे...

निवृत्तीनंतरही देशसेवेचा वसा ; शहीद जवानांच्या वीरपत्नींना मोहन नातू यांची अनोखी मदत !

इमेज
  ​ अहिल्यानगर ( प्रतिनिधी):- अहिल्यानगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन नरहरी नातू यांनी समाजसेवेचा एक आदर्श पायंडा पाडला आहे. निवृत्तीनंतरही आपली सामाजिक बांधिलकी जपत, त्यांनी शहीद सैनिकांच्या वीरपत्नींना दरवर्षी १ लाख ११ हजार रुपयांचे मानधन देण्याचा संकल्प केला आहे. ​गेल्या ११ वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू असून, यासाठी ते स्वतःची मदत आणि २०० मित्रांच्या सहकार्याने हा निधी जमा करतात. व्यवसायातून निवृत्त झाल्यावरही सैनिकांच्या त्यागाला सलाम करणाऱ्या मोहन नातू यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ******************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा... 👇🏻 https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

सीटू संलग्न जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचा हळदीकुंकू कार्यक्रम व तालुका मेळावा संपन्न.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी): सीटू संलग्न जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम व तालुका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्हा कमिटी सदस्य तथा जिल्ह्यात संघटनेचा भक्कम पाया रोवणाऱ्या कॉम्रेड शीतलताई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉम्रेड नंदाताई बांगर, जिल्हा सचिव कॉम्रेड संतोष शिर्के, जिल्हा कोषाध्यक्षा कॉम्रेड हेमलता शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मार्गदर्शन करत संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. याचवेळी सन २०२५ साठी सभासद वर्गणी भरण्यासाठी विशेष कॅम्प तसेच कोर्ट फंडासाठी आवश्यक कागदपत्र संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कॉम्रेड संतोष शिर्के, कॉम्रेड कल्याणी रायकर, कॉम्रेड अनिल रायकर, कॉम्रेड आफरीन सय्यद, कॉम्रेड अर्चना उमाप, कॉम्रेड रवी इंगळे यांनी व...

भूगोलाची व्याप्ती मातीपासून ते उपग्रहापर्यंत!" - न्यू आर्ट्स पारनेर महाविद्यालयात 'जिओ फेस्ट' उत्साहात संपन्न.

इमेज
पारनेर(प्रतिनिधी):- आजच्या युगात भूगोल हा केवळ नकाशापुरता मर्यादित राहिला नसून त्याची व्याप्ती आता माती ते उपग्रह अशी प्रचंड विस्तारली आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज आपल्या पायाखालच्या मातीच्या कणापासून ते अंतराळातील उपग्रहापर्यंतचा अभ्यास भूगोलात सामावलेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ भूगोल अभ्यासक प्रा. पांडुरंग चौधरी यांनी केले. ​पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या भूगोल विभागातर्फे आयोजित भूगोल दिन आणि जिओ फेस्ट  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते.       ​यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी जीवनाशी निगडीत भौगोलिक घटना आणि घडामोडींवर आधारित विविध पोस्टर्स आणि मॉडेल्सचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी साकारलेली कल्पक मॉडेल्स आणि विषयाची मांडणी पाहून उपस्थितांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.       विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. चौधरी म्हणाले, पृथ्वीचा विचार करता भारत देश एका ट...

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा - पालकमंत्री विखे पाटील श्रीगोंद्यात 'बिबट रेस्क्यू सेंटर' व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना.

इमेज
​अहिल्यानगर(प्रतिनिधी): "शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने व लोकाभिमुख होऊन काम करावे," असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ​श्रीगोंदा येथील 'माऊली' संपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, श्रीगोंद्यात वनविभागाची मोठी जमीन विनावापर पडून आहे. या जमिनीचा वापर जनहिताच्या विकासकामांसाठी करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव त्वरित पाठवावा. तसेच, संगमनेरच्या धर्तीवर श्रीगोंद्यातही 'लेपर्ड रेस्क्यू सेंटर' (बिबट्या निवारा केंद्र) उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावा. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहण्यासाठी 'पोलिसिंग' सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गरज पडल्यास नवीन पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले....

फॉलोअर