पोस्ट्स

खंडणी मागणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड; उद्योजकांकडून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचा सत्कार.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):-                मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजकांना खंडणी मागीतल्याची तक्रार उदयोजकांनी थेट पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली होती. पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करत खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उनवणे, राजेश पाटील या संशयित आरोपींची एम आय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व त्यांच्या टीमने धिंड काढली.                     याप्रकरणी आमी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा आज (ता. १९) सत्कार करण्यात आला. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे. यावेळी एमआयडीसीचे प्रभारी अधिकारी माणिक चौधरी उपस्थित होते. ********************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅन...

कामरगाव मधील ज्येष्ठ नागरीक चंद्रकांत साठे यांचे वृद्धापकाळाने निधन. दशक्रिया विधी १८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी होणार.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-  कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथील जेष्ठ नागरीक चंद्रकांत कान्हू साठे (वय ७९) यांचे ९ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने दुखः द निधन झाले. गावातील विविध कार्यकारी  सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात त्यांनी सेल्समन म्हणून ४० वर्ष उत्कृष्ट  काम केले. गावातील सामाजिक उपक्रमात त्यांचे विशेष योगदान होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  माजी सैनिक अशोकराव साठे, व्यवसायिक भाऊसाहेब साठे,  उपक्रमशील शिक्षक संतोष साठे यांचे ते वडील होते. गावातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक उपक्रमात त्यांच्या परिवाराचा मोलाचा सहभाग असतो. कामरगाव येथील अमरधाममध्ये दि १८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी सकाळी ८ वा त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे. ******************************************** 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा... 👇🏻 https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

डॉ राजु म्हस्के महाराष्ट्र शासन राज्य गो सेवा आयोग पुरस्काराने सन्मानित.

इमेज
        अहिल्यानगर (प्रतिनिधी) :-  दि.14  फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी महाराष्ट्र शासना गो सेवा आयोग पुणे तर्फे सन २०२५-२६ मध्ये आयोजित महाराष्ट्र शुध्द देशी गोवंश सन्मान योजने अंतर्गत ता. जि अहिल्यानगर मधील दहिगाव गावचे प्रगतशील शेतकरी डॉ.राजु मुकुंदराव म्हस्के व प्रमिला प्रकाश म्हस्के  यांनी सादर केलेल्या नामांकनास राज्यस्तरीय पुरस्कार गोवंश-प्रक्षेत्र विभागातून निवडीद्वारे नामदार पंकजा ताई मुंडे (पशु संवर्धन मंत्री) यांच्या हस्ते तसेच राज्यमंत्री  श्री शेखर मुंदडा (अध्यक्ष महाराष्ट्र गो सेवा आयोग)यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला व गो सेवा आयोगाचा श्रेष्ठ राजदुत म्हणून घोषित करण्यात आले. ********************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा... 👇🏻 https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

इमेज
  अहिल्यानगर (प्रतिनिधी) :  कामरगाव ता. अहिल्यानगर परिसरात एका बंद घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचे दागिने चोरून लंपास केल्याची घटना घडली आहे.  सदर चोरीच्या घटनेत खरेदी करतेवेळेची अंदाजे किंमत रु ८६०००/-  परंतु सदयस्थितीतील मार्केट भावाप्रमाणे अंदाजे किंमत ६०००००/ (सहा लाख रुपये) किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे असे मिळालेल्या माहितीनुसार समजते. याबाबत फिर्यादी प्राध्यापक डॉ.अशोक विठ्ठल ठोकळ (वय ४९, रा. मुलानवस्ती, कामरगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की. कामरगाव येथील प्राध्यापक डॉ. अशोक ठोकळ एका नामांकित महाविदयालयात कार्यरत आहेत. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रात सण झाल्यानंतर त्यांच्या पत्नी यांनी दागिने घरातील कपाटाखाली ठेवले होते. परंतु १० फेब्रुवारी रोजी घरात झाडलोट करताना दागिने नसल्याचे आढळले. त्यांनी डॉ.अशोक ठोकळ यांना फोनद्वारे सदर घटना कळवली. त्यानंतर त्यान...

अहिल्यानगरच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा 'स्नेहबंध' तर्फे सत्कार

इमेज
  (अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा शाल व वृक्ष देऊन सत्कार करताना 'स्नेहबंध'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.) अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी महापौर सौ. गाडे यांना शाल व वृक्ष देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर अधिक स्वच्छ, हरित व प्रगत शहर घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाच्या माध्यमातून हा सत्कार अधिक अर्थपूर्ण ठरला. महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकाभिमुख उपक्रम, विकासकामे व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी सांगितले. ********************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास...

माझी एक आठवण...महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व स्व.अजितदादांबद्दल...🙏

इमेज
         बारामती येथे २२ ते २४ डिसेंबर २०१२ या कालावधीत ९३ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. हे संमेलन प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी बारामतीची रंगीत विद्युत रोषणाई आणि भव्य तयारी लक्षवेधी ठरली होती. यासाठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष त्यावेळी नुकतेच परत सिंचन घोट्याळ्यात आरोप झाल्यावर राजीनामा दिल्यानंतर निर्दोष सुटल्यावर ७ डिसेंबर ला परत नव्याने  उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार हे होते. तर उदघाटक म्हणून केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब हे होते व प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे होते . साहित्य, नाट्य याची मला आवड असल्याने या कार्यक्रमासाठी जायचे असे  मी व आमचे मित्र रमेश पवार सर, (बीड ) यांनी ठरवले . २२ डिसेंबरला शनिवार होता, शाळा सुटल्यावर नगर एसटी बस स्टँडवरुन एसटीने डायरेक्ट रात्रीचा प्रवास करून २३ डिसेंबरला रविवारी  बारामती गाठले. पहाटेच एसटी स्टँडवरच सर्व प्रातःविधी, अंघोळ वगैरे उरकून बारामती येथील मोरोपंत मंडपात नाटय संमे...

निवृत्तीनंतरही देशसेवेचा वसा ; शहीद जवानांच्या वीरपत्नींना मोहन नातू यांची अनोखी मदत !

इमेज
  ​ अहिल्यानगर ( प्रतिनिधी):- अहिल्यानगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन नरहरी नातू यांनी समाजसेवेचा एक आदर्श पायंडा पाडला आहे. निवृत्तीनंतरही आपली सामाजिक बांधिलकी जपत, त्यांनी शहीद सैनिकांच्या वीरपत्नींना दरवर्षी १ लाख ११ हजार रुपयांचे मानधन देण्याचा संकल्प केला आहे. ​गेल्या ११ वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू असून, यासाठी ते स्वतःची मदत आणि २०० मित्रांच्या सहकार्याने हा निधी जमा करतात. व्यवसायातून निवृत्त झाल्यावरही सैनिकांच्या त्यागाला सलाम करणाऱ्या मोहन नातू यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ******************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा... 👇🏻 https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

फॉलोअर