पोस्ट्स

तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य-- स.पो.नि. गणेश वारुळे

इमेज
. अहिल्यानगर (प्रतिनिधी):-  अहिल्यानगर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरणात जीवन जगता येईल यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे मत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी व्यक्त केले.  नुकताच वारुळे यांनी पदभार स्वीकारला त्यामुळे कामरगावचे मा. सरपंच तुकाराम कातोरे, स्व: गोपोनाथ मुंडे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ पोटे, पिंपळगाव कौडा येथील युवा नेतृत्व संदीप कोल्हे, संभाजी गोरे यांच्या शिष्ट मंडळाने पोलीस स्टेशनला जाऊन सत्कार केला. यावेळी बीट हवालदार श्रीम. कुंदा रेपाळे उपस्थित होत्या अशी माहिती तुकाराम कातोरे यांनी दिली.  सध्या तालुक्यात काही भागात लुटमाऱ्या, चोऱ्या, दरोडे अशा घटना घडत असतात. त्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. त्यानुसार अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात वाहने आडवून लुटमार करणाऱ्या एका टोळीला आठ दिवसापूर्वी जेरबंद केले आहे. या परिसरात अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यानुसार रात्रीच्या वेळी महामार्गावर फिरते गस्त पथक कार्यरत ठेवले जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी असे आवाहन...

शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक. प्रांत अधिकारी सुधीर पाटील.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):-  दि.05 शासनाच्या सर्वच योजना समाजहिताच्या असतात. त्या लोकाभिमुख करण्यासाठी व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी व पदाधिकार्‍यांनी संयुक्तपणे केले पाहिजे त्यासाठी जास्तीचा लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सुधीर पाटील यांनी व्यक्त केले.  *छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य* अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्व तयारी करण्यासाठी अहिल्यानगर तालुक्यातील चास मंडळातंर्गत अकरा गावातील सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, सेतूचालक, सामाजिक कार्यकर्ते, ग्राम महसूल अधिकारी, रेशन दुकानदार  यांची संयुक्त कार्यशाळा प्रांत अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चास येथे दिनांक 03/03/2026 रोजी आयोजित केली होती. प्रारंभी मंडळाधिकारी  वैशाली हिरवे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे यांनी प्रास्ताविक भाषणात अभियानाचा हेतू स्पष्ट केला.  09 एप्रिल 2026 रोजी होणार्‍या महाराजस्व अभियानात 7/12 उताऱ्यावरील मयत खातेदारांच्या वारस नोंदी करून तो उतारा जिवंत करणे, उताऱ्यावरून ...

परदेशात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्हयातील नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी.

इमेज
​अहिल्यानगर (प्रतिनिधी): - मध्यपूर्व व आखाती परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ​राज्य‌ व जिल्हा पातळीवरील मदत क्रमांक : आपत्कालीन परिस्थितीत किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राचे (२४x७) क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत : ​टोल फ्री क्रमांक : १०७० ​फोन : ०२२-२२०२७९९०, +९१-९३२१५८७१४३ ​ई- मेल : controlroom@gov.in ​तसेच, अहिल्यानगर...

अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’चा शुभारंभ. ; वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त. ; डिजिटल युगातही वाचन संस्कृती अबाधित, ग्रंथोत्सव ज्ञानपरंपरेचा सन्मान - शालिनीताई विखे पाटील.

इमेज
​अहिल्यानगर ( प्रतिनिधी) दि. २८ - ग्रंथांना आपण ‘गुरू’ची उपमा देतो. जसा गुरू शिष्याला ज्ञानाने समृद्ध करतो, तसेच ग्रंथ वाचकाला वैचारिक व बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करतात. डिजिटल क्रांतीच्या युगात काळ बदलत असला तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, ती नव्या माध्यमांतून अधिक व्यापक होईल, असा विश्वास शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून समाजातील सर्व घटकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ​प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती विखे पाटील बोलत होत्या. ​यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे, सरपंच कल्पना मैड, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहायक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलूलकर, प्रा. गणेश भगत, चंद्रकांत पालवे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्य राम पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती....

नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंचे फुलांच्या वर्षावात स्वागत स्लग -साकत येथे ग्रामस्थांनी काढली भव्य मिरवणूक. ;

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-   साकत खुर्द (ता. नगर) येथील  सुभाष पवार,   सुभाष शिंदे, मोहनतात्या चितळकर या  वारकऱ्यांनी पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार व स्वागत करण्यात आले.  पायी  हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास करत चार महिन्याच्या कालावधीत   कालावधीत त्यांनी दररोज किमान दहा ते पंधरा किलोमीटरचे अंतर पार करत आपली परिक्रमा यशस्वी पूर्ण केली. परिक्रमेच्या दरम्यान त्यांनी मार्गावरील विविध मंदिरे, आश्रम व देवस्थाने यांचे दर्शन घेतले. हा प्रवास जंगल भागातून झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऊन, वारा, थंडी तसेच शारीरिक कष्ट असूनही त्यांनी कोणतीही तक्रार न करता अत्यंत श्रद्धा, संयम व आत्मविश्वासाने हा खडतर प्रवास पूर्ण केला. चार महिन्याची खडतर परिक्रमा पूर्ण करून परतीचा प्रवास  करून साकतखुर्द येथे त्यांचे गुरुवारी ( दि. २६)  आगमन झाले. आगमन होताच ग्रामस्थांनी तसेच नातेवाईकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच फुलांचा वर्षाव करत त्यांचे जल्लोषात स्वागत  केले. यावेळी त्यांच...

लेखक सासवडे यांना राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

इमेज
अहिल्यानगर: अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत, साहित्योत्सव अंतर्गत राज्यस्तरीय खुली साहित्य लेखन स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. साहित्य पाठविण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत दिलेली होती. ही स्पर्धा 20, 21, 22 फेब्रुवारी 2026 अशा तीन दिवसात पार पडली. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून लेखक, कवी, नाट्यछटाकार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता.        साहित्योत्सवाच्या कथा लेखन स्पर्धेत आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावचे लेखक अजिनाथ सासवडे यांच्या "मेटे मामा" या कथेसाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असून त्याचे वितरण लवकरच करण्यात येईल. लेखक अजिनाथ सासवडे यांना यापूर्वी देखील अनेक राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांचे सुखाचा शोध नावाचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. ******************************************** 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅन...

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .

इमेज
अहिल्यानगर( प्रतिनिधी):- तालुक्यातील गुन्हेगारीला चाप लावण्याकरिता नव्याने रूजू झालेले नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे व त्यांच्या टीमने कारवाईचा धडाका लावल्याचे दिसून येत असून, नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दि.२१/०२/२०२६ रोजी कोथरुळ, ता. माजलगाव जि. बीड येथुन इसम नामे-बालासाहेब काशीनाथ कदम व त्यांचा साथीदार पंकज श्रीराम कदम असे स्वीफ्ट कार नं- MH १२ UM २२४८  या कारने पुणे येथे त्यांचे भावास भेटण्यासाठी जात असताना दि-२२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.३० मि. सुमारास  ते कामरगाव शिवारातील हाँटेल गुरुदत्त हाँटेलचे जवळ गाडी रोडचे बाजूला घेवुन थांबले असता. तेथे चार अनोळखी इसमांनी हातात कोयते घेवून येत फिर्यादी व साक्षीदार यांच्या गळ्याला लावले. व फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांना त्यांचे स्विफ्ट गाडीमध्ये बसवून फिर्यादी व साक्षीदार  यांना नगरकडे नेत असताना स्विफ्ट कार व लक्झरीचा अपघात झाला. सदर आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांचे १८,०००/- रुपये रोख, ५०००० रुपये ऑनलाईन व ४७,००० हजार रुपये किमतीचे मोबाईल, चार्जर, जर्किंग असा एकुण १,१५,००००...

फॉलोअर