नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंचे फुलांच्या वर्षावात स्वागत स्लग -साकत येथे ग्रामस्थांनी काढली भव्य मिरवणूक. ;
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- साकत खुर्द (ता. नगर) येथील सुभाष पवार, सुभाष शिंदे, मोहनतात्या चितळकर या वारकऱ्यांनी पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार व स्वागत करण्यात आले. पायी हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास करत चार महिन्याच्या कालावधीत कालावधीत त्यांनी दररोज किमान दहा ते पंधरा किलोमीटरचे अंतर पार करत आपली परिक्रमा यशस्वी पूर्ण केली. परिक्रमेच्या दरम्यान त्यांनी मार्गावरील विविध मंदिरे, आश्रम व देवस्थाने यांचे दर्शन घेतले. हा प्रवास जंगल भागातून झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऊन, वारा, थंडी तसेच शारीरिक कष्ट असूनही त्यांनी कोणतीही तक्रार न करता अत्यंत श्रद्धा, संयम व आत्मविश्वासाने हा खडतर प्रवास पूर्ण केला. चार महिन्याची खडतर परिक्रमा पूर्ण करून परतीचा प्रवास करून साकतखुर्द येथे त्यांचे गुरुवारी ( दि. २६) आगमन झाले. आगमन होताच ग्रामस्थांनी तसेच नातेवाईकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच फुलांचा वर्षाव करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांच...