पोस्ट्स

वरखेडच्या महालक्ष्मी मातेचे ४ लाख भाविकांनी घेतले दर्शन. यात्रोत्सव उत्साहात संपन्न.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या मुख्य दिवशी काल मंगळवारी सुमारे चार लाख भाविकांनी दर्शन घेतले. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीचा यात्रा उत्सव उत्साहाच्या वातावरणात पार पडला.धर्मदाय आयुक्त जयश्री पाखरे यांची निरीक्षक म्हणून वरखेड देवस्थानला नेमणूक केली. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी देवीची विधीवत पूजा करून दर्शन घेतले.श्री क्षेत्र वरखेड येथील भाविकांनी रात्री देवी मंदिरात होम करुन देवीची पुजा व जागर केला. 6 एप्रिल रोजी गावकऱ्यांनी पैठण येथून आणलेल्या देवीच्या पालखीची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढुन पालखी मंदिरात नेली. गावातील महिलांनी मिरवणुकीदरम्यान पालखीची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. देवीची पालखी मंदिरामध्ये आणून मंदिर समिती व गावकऱ्यांच्या वतीने पुजा करण्यांत आली. देवी महोत्सवानिमित्त परंपरेने संपूर्ण गावातून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असल्याने भाविक मोठ्या संख्येने नवसपूर्ती करतात. यात्रेनिमित्त राज्...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वंदे मातरम् रथाचे जल्लोषात स्वागत*

इमेज
  अहिल्यानगर (हेमंत साठे):- वंदे मातरम् गीत निर्मितीच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वंद्य वंदे मातरम्  या अभियानांतर्गत दिनांक 12 मार्च 2026 रोजी अहील्यानगर शहरातील हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालयात वंदे मातरम् रथाचे स्वागत उपमहापौर श्री.धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्री.मिलिंद सबनीस, आयोजन समितीचे अध्यक्ष श्री.सागर वैद्य, अधिसभा सदस्य श्री.कृष्णा भंडलकर,श्री.राहुल पाखरे,श्री.अमोल घोलप,सहायक कुलसचिव डॉ.अजय ठुबे,डॉ.शिवप्रसाद घालमे.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.माहेश्वरी गावित उपस्थित होते.यावेळी उपमहापौर श्री.धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम असल्याचा मंत्र दिला.श्री.सागर वैद्य यांनी अभियानाचा उद्देश व पार्श्वभूमी स्पष्ट केली.कार्यक्रमास हिंद सेवा मंडळाचे संस्था पदाधिकारी,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******************************************** 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त श...

जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया. ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे.

इमेज
अहिल्यानगर/प्रतिनिधी- जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्यामध्ये नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष पथकामार्फत अचानक तपासणी करावी आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. तसेच, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील एलपीजी गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, बीपीसीएल कंपनीचे राजकुमार मिश्रा यांच्यासह संबंधित गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी व गॅस वितरक उपस्थित होते.   सध्या जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. नियमानुसार गॅस वितरण होत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच,...

दहिगाव येथे महाराजस्व शिबीर उत्साहात संपन्न . ; एप्रिल मध्ये नगर तालुक्यात जनता दरबार भरवणार -आ.विक्रमसिंह पाचपुते.

इमेज
अहिल्यानगर /प्रतिनिधी:- नगर तालुक्यातील  दहिगाव येथील श्री राम मंगल कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते,  कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रथम पुजन झाले तदनंतर जिल्हा परिषद शाळेतील मुलींकडून महाराष्ट्र गीतगायन करण्यात आले. केडगाव मंडल अधिकारी रुपाली टेमक यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या ठिकाणी महसूल विभागा अंतर्गत येणारा पुरवठा विभागातील कामे गोरगरीब जनतेचा जिव्हाळ्याचा विषय रेशनकार्ड मध्ये नाव कमी करणे , समाविष्ट करणे, रेशनिंग केवायसी करणे या विभागाचे पुरवठा अधिकारी शिवराज पवार यांच्यासह कर्मचारी जागेवर संबंधित प्रश्न मार्गी लावत होते. बांधकाम मंडळ सदर ठिकाणी नाव नोंदणी, नुतनीकरण बांधकाम जनजागृती कार्यक्रम काम बांधकाम  नोंदणी  सह जाग्यावर सदर प्रश्न निपटारा करत होते. जिल्हा रेशीम उद्योग कार्यलय अंतर्गत शेतकरी रेश्म उद्योग नावनोंदणी व्यवसाय मार्गदर्शन करणे, कृषी विभाग शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी शेतकरी पिएम किसन प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी...

तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य-- स.पो.नि. गणेश वारुळे

इमेज
. अहिल्यानगर (प्रतिनिधी):-  अहिल्यानगर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरणात जीवन जगता येईल यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे मत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी व्यक्त केले.  नुकताच वारुळे यांनी पदभार स्वीकारला त्यामुळे कामरगावचे मा. सरपंच तुकाराम कातोरे, स्व: गोपोनाथ मुंडे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ पोटे, पिंपळगाव कौडा येथील युवा नेतृत्व संदीप कोल्हे, संभाजी गोरे यांच्या शिष्ट मंडळाने पोलीस स्टेशनला जाऊन सत्कार केला. यावेळी बीट हवालदार श्रीम. कुंदा रेपाळे उपस्थित होत्या अशी माहिती तुकाराम कातोरे यांनी दिली.  सध्या तालुक्यात काही भागात लुटमाऱ्या, चोऱ्या, दरोडे अशा घटना घडत असतात. त्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. त्यानुसार अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात वाहने आडवून लुटमार करणाऱ्या एका टोळीला आठ दिवसापूर्वी जेरबंद केले आहे. या परिसरात अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यानुसार रात्रीच्या वेळी महामार्गावर फिरते गस्त पथक कार्यरत ठेवले जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी असे आवाहन...

शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक. प्रांत अधिकारी सुधीर पाटील.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):-  दि.05 शासनाच्या सर्वच योजना समाजहिताच्या असतात. त्या लोकाभिमुख करण्यासाठी व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी व पदाधिकार्‍यांनी संयुक्तपणे केले पाहिजे त्यासाठी जास्तीचा लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सुधीर पाटील यांनी व्यक्त केले.  *छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य* अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्व तयारी करण्यासाठी अहिल्यानगर तालुक्यातील चास मंडळातंर्गत अकरा गावातील सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, सेतूचालक, सामाजिक कार्यकर्ते, ग्राम महसूल अधिकारी, रेशन दुकानदार  यांची संयुक्त कार्यशाळा प्रांत अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चास येथे दिनांक 03/03/2026 रोजी आयोजित केली होती. प्रारंभी मंडळाधिकारी  वैशाली हिरवे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे यांनी प्रास्ताविक भाषणात अभियानाचा हेतू स्पष्ट केला.  09 एप्रिल 2026 रोजी होणार्‍या महाराजस्व अभियानात 7/12 उताऱ्यावरील मयत खातेदारांच्या वारस नोंदी करून तो उतारा जिवंत करणे, उताऱ्यावरून ...

परदेशात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्हयातील नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी.

इमेज
​अहिल्यानगर (प्रतिनिधी): - मध्यपूर्व व आखाती परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ​राज्य‌ व जिल्हा पातळीवरील मदत क्रमांक : आपत्कालीन परिस्थितीत किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राचे (२४x७) क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत : ​टोल फ्री क्रमांक : १०७० ​फोन : ०२२-२२०२७९९०, +९१-९३२१५८७१४३ ​ई- मेल : controlroom@gov.in ​तसेच, अहिल्यानगर...

फॉलोअर