जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची भोरवाडी ग्रामस्थांची मागणी. सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे यांचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन.
अहिल्यानगर /प्रतिनिधी: नगर तालुक्यातील मौजे भोरवाडी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी तातडीने चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे तसेच प्रगतशील शेतकरी प्रदीप वाघ व बापूसाहेब वायळ यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन देत केली आहे. यावेळी कामरगाव येथे आयुक्तांनी दिलेल्या भेटीवेळी अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर तहसिलदार ढवळे,नायब तहसिलदार अभिजित वांढेकर महसूल कर्मचारी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. Adv याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भोरवाडी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी आवश्यक असलेल्या हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पशुपालकांकडे शेती व पशुपालन हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन असून, सध्या जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधनाच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम ह...