पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कामरगावच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ! सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांचा ग्रामस्थांकडून "लोकसन्मान".

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी)- कामरगाव( ता.अहिल्यानगर ) येथील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई अनुदान मिळावे यासाठी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच वसंतराव ठोकळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार,माहे सप्टेंबर 2025 मध्ये गावात अतिवृष्टी झाल्यामुळे 383.96 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले होते.त्यात कांदा,सोयाबीन,उडीद, व फुल शेतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.बाधित झालेल्या क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करावेत अन्यथा अहिल्यानगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला होता.त्याची प्रशासनाने दखल घेऊन तहसीलदार संजय शिंदे यांच्या आदेशावरून ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे' कृषी सहाय्यक युवराज देवकर यांनी 537 शेतकऱ्यांच्या शेत बांधावर चिखल तुडवीत व पाऊस धारा झेलीत पंचनामे करून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल दिला. होता.त्यानुसार 51 लाख 17 हजार 510 रुपये अनुदान मंजूर झाले तसेच या...

ग्रामपंचायतने लावले विकासाचे झाड.. त्याला येणार फळ... त्याचे नाव केळ... अनोख्या आंदोलनाचे फोटोसह मजकूर सोशल मिडीयावर व्हायरल. नगर तालुक्यातील या गावातील युवकांच्या आंदोलनाची चर्चा.

इमेज
अहिल्यानगर तालुका (प्रतिनिधी) -  ग्रामपंचायतने लावले विकासाचे झाड, त्याला येणार फळ, त्याचे नाव केळ अशा आशयाचे रस्त्यातील खड्ड्यांमधे केळीचे झाड लावून नगर तालुक्यातील भोरवाडी गावातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या अनोखा निषेध नोंदवत मजकूर फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले आहेत.        मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार  गावच्या परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे गावकरी प्रचंड त्रस्त झालेले असताना ग्रामपंचायत अथवा जिल्हा परिषद प्रशासन हे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील खड्ड्यात केळीचे झाड लावून त्याची पूजा केली आणि त्याचे फोटो काढून त्यावर ग्रामपंचायतने लावले विकासाचे झाड, त्याला येणार फळ, त्याचे नाव केळ असा मजकूर लिहून ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. या अनोख्या आंदोलनाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे. नगर तालुक्यातील भोरवाडी गावात तरुणांनी हे आंदोलन केले आहे. भोरवाडीहून नगर ला येण्यासाठी भोरवाडी ते अकोळनेर हा अवघा ३-४ किमीचा रस्ता आहे. या रस्त्याची सध्या प्रचंड ...

शेतकऱ्यांच्या 'बांधावरच न्याय निवाड्याचा' कोपरगाव पॅटर्न !... शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले बांधावर !... शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले बांधावर ! तहसीलदार महेश सावंत यांची उल्लेखनीय कामगिरी.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील शेत - शिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा केला आहे. मागील तीन महिन्यांत ६० प्रकरणे निकाली निघून सुमारे ४५ किमी रस्ते मोकळे झाले. यामुळे ३५४ कुटुंबांची शेतरस्त्याची सोय होऊन २१७५ शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. कोपरगाव तहसीलदार यांच्या 'बांधावरच न्यायनिवाडा' या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून 'कोपरगाव पॅटर्न' म्हणून राज्यात नावारूपाला आला असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, कौटुंबिक वाटणी आणि तुकडे यामुळे दरडोई जमीनधारणा कमी होत असून शेतरस्त्यांवरून वारंवार वाद निर्माण होतात. त्यामुळे वेळ, श्रम व संसाधनांचा अपव्यय होऊन कायदा - सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश सावंत यांनी ‘बांधावरच न्यायनिवाडा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. यात गावनकाशानुसार अतिक्रमित ...

रुईछत्तीसीचे सुपुत्र नितीन गोरे यांचा कोल्हापुरात सन्मान.

इमेज
  Adv ******************************************* अहिल्यानगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील रूईछत्तीसी येथील मुळ रहिवासी  नितीन दत्तात्रय गोरे हे विद्या मंदिर तांदुळवाडी कोल्हापूर जिल्हात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आर्दश शिक्षक पुरस्कारांचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते नितीन गोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.  शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कामगिरी केल्याबद्दल  ईतर शिक्षकांना पुरस्कार मिळाले राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य म्हणजे कोल्हापूर जिल्हा ह़ोय एक सुसंस्कृत आणि जुन्या पिढीपंरपंरा जोपसणरा एक आर्दश जिल्हा कोल्हापूराचा ‌फेटा व कोल्हापुरी चप्पल राज्यभर प्रसिद्ध आहे.आई‌ अंबाबाई व ज्योतिबांच धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे.अशा या जिल्ह्यात रुईछत्तीसीचे रहिवासी गोरे यांना या आधी दैनिक गगनतारा आर्दश शिक्षक पुरस्कार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट कोल्हापूर ‌यांच्या वतीने कोविड कालावधी मध्ये आँनलाईन कार्याबद्दल गौरवण्यात आले,  शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य...

फॉलोअर