मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामरगाव येथे महायुतीच्या वतीने वटवृक्ष लागवड.
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव येथे मा.खासदार तथा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीच्या वतीने वटवृक्ष लागवड करण्यात आली. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे यांनी दिली.
मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीच्या वतीने कामरगाव येथील स्मशानभूमी परिसरात वटवृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित जेष्ठ नेते तथा प्रगतीशील शेतकरी गोरख साठे, सामाजिक कार्यकर्ते तथा मा.सरपंच तुकाराम कातोरे, सरपंच संदीप ढवळे,जेष्ठ नेते श्यामराव आंधळे, युवा नेते संदीप लष्करे, सोसायटी मा.चेअरमन अनिल आंधळे, मा.चेअरमन शिवाजी साठे, सुदाम ठोकळ सर, व्हाईस चेअरमन राजेंद्र राजगुरू, भाऊ राजगुरू, ग्रामपंचायत सदस्य राजू पठाण,लक्ष्मण ठोकळ, प्रदीप साठे, वसीम शेख, इम्रान शेख, संदीप भिंगारदिवे, भिमराव सातपुते, योगेश ठोकळ, संदीप पाडेकर, ठोकळ मेजर, अमोल गुंजाळ, संतोष साठे, सौरभ सातपुते, सोहम कुसळकर, यांच्यासह कामरगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाप्रमुख मनोज ठोकळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. तसेच
डॉ.सुजय विखे पाटील विचार मंच अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा