पोस्ट्स

माझी एक आठवण...महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व स्व.अजितदादांबद्दल...🙏

इमेज
         बारामती येथे २२ ते २४ डिसेंबर २०१२ या कालावधीत ९३ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. हे संमेलन प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी बारामतीची रंगीत विद्युत रोषणाई आणि भव्य तयारी लक्षवेधी ठरली होती. यासाठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष त्यावेळी नुकतेच परत सिंचन घोट्याळ्यात आरोप झाल्यावर राजीनामा दिल्यानंतर निर्दोष सुटल्यावर ७ डिसेंबर ला परत नव्याने  उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार हे होते. तर उदघाटक म्हणून केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब हे होते व प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे होते . साहित्य, नाट्य याची मला आवड असल्याने या कार्यक्रमासाठी जायचे असे  मी व आमचे मित्र रमेश पवार सर, (बीड ) यांनी ठरवले . २२ डिसेंबरला शनिवार होता, शाळा सुटल्यावर नगर एसटी बस स्टँडवरुन एसटीने डायरेक्ट रात्रीचा प्रवास करून २३ डिसेंबरला रविवारी  बारामती गाठले. पहाटेच एसटी स्टँडवरच सर्व प्रातःविधी, अंघोळ वगैरे उरकून बारामती येथील मोरोपंत मंडपात नाटय संमे...

निवृत्तीनंतरही देशसेवेचा वसा ; शहीद जवानांच्या वीरपत्नींना मोहन नातू यांची अनोखी मदत !

इमेज
  ​ अहिल्यानगर ( प्रतिनिधी):- अहिल्यानगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन नरहरी नातू यांनी समाजसेवेचा एक आदर्श पायंडा पाडला आहे. निवृत्तीनंतरही आपली सामाजिक बांधिलकी जपत, त्यांनी शहीद सैनिकांच्या वीरपत्नींना दरवर्षी १ लाख ११ हजार रुपयांचे मानधन देण्याचा संकल्प केला आहे. ​गेल्या ११ वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू असून, यासाठी ते स्वतःची मदत आणि २०० मित्रांच्या सहकार्याने हा निधी जमा करतात. व्यवसायातून निवृत्त झाल्यावरही सैनिकांच्या त्यागाला सलाम करणाऱ्या मोहन नातू यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ******************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा... 👇🏻 https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

सीटू संलग्न जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचा हळदीकुंकू कार्यक्रम व तालुका मेळावा संपन्न.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी): सीटू संलग्न जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम व तालुका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्हा कमिटी सदस्य तथा जिल्ह्यात संघटनेचा भक्कम पाया रोवणाऱ्या कॉम्रेड शीतलताई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉम्रेड नंदाताई बांगर, जिल्हा सचिव कॉम्रेड संतोष शिर्के, जिल्हा कोषाध्यक्षा कॉम्रेड हेमलता शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मार्गदर्शन करत संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. याचवेळी सन २०२५ साठी सभासद वर्गणी भरण्यासाठी विशेष कॅम्प तसेच कोर्ट फंडासाठी आवश्यक कागदपत्र संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कॉम्रेड संतोष शिर्के, कॉम्रेड कल्याणी रायकर, कॉम्रेड अनिल रायकर, कॉम्रेड आफरीन सय्यद, कॉम्रेड अर्चना उमाप, कॉम्रेड रवी इंगळे यांनी व...

भूगोलाची व्याप्ती मातीपासून ते उपग्रहापर्यंत!" - न्यू आर्ट्स पारनेर महाविद्यालयात 'जिओ फेस्ट' उत्साहात संपन्न.

इमेज
पारनेर(प्रतिनिधी):- आजच्या युगात भूगोल हा केवळ नकाशापुरता मर्यादित राहिला नसून त्याची व्याप्ती आता माती ते उपग्रह अशी प्रचंड विस्तारली आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज आपल्या पायाखालच्या मातीच्या कणापासून ते अंतराळातील उपग्रहापर्यंतचा अभ्यास भूगोलात सामावलेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ भूगोल अभ्यासक प्रा. पांडुरंग चौधरी यांनी केले. ​पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या भूगोल विभागातर्फे आयोजित भूगोल दिन आणि जिओ फेस्ट  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते.       ​यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी जीवनाशी निगडीत भौगोलिक घटना आणि घडामोडींवर आधारित विविध पोस्टर्स आणि मॉडेल्सचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी साकारलेली कल्पक मॉडेल्स आणि विषयाची मांडणी पाहून उपस्थितांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.       विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. चौधरी म्हणाले, पृथ्वीचा विचार करता भारत देश एका ट...

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा - पालकमंत्री विखे पाटील श्रीगोंद्यात 'बिबट रेस्क्यू सेंटर' व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना.

इमेज
​अहिल्यानगर(प्रतिनिधी): "शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने व लोकाभिमुख होऊन काम करावे," असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ​श्रीगोंदा येथील 'माऊली' संपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, श्रीगोंद्यात वनविभागाची मोठी जमीन विनावापर पडून आहे. या जमिनीचा वापर जनहिताच्या विकासकामांसाठी करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव त्वरित पाठवावा. तसेच, संगमनेरच्या धर्तीवर श्रीगोंद्यातही 'लेपर्ड रेस्क्यू सेंटर' (बिबट्या निवारा केंद्र) उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावा. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहण्यासाठी 'पोलिसिंग' सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गरज पडल्यास नवीन पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले....

सीएसआर कनेक्ट कॉनक्लेव २०२६ परिषद उत्साहवर्धक वातावरणात संपन्न. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया सिईओ आनंद भंडारी यांचे जिहयात मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सीएसआर संस्थाना आवाहन.

इमेज
अहिल्यानगर ( हेमंत साठे):-   सीएसआर ही समाजाभिमुख विकासासाठीची प्रभावी साधनयोजना आहे. जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक व मानवी विकास निर्देशांक उंचावण्यासाठी उद्योग व सीएसआर संस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या गरजेनुसार व प्राधान्यक्रमानुसार निधीचे लक्ष्यित नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. ​जिल्ह्यातील विविध विकासात्मक गरजांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा नियोजनबद्ध, समन्वयित व परिणामकारक वापर व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 'सीएसआर कनेक्ट कॉनक्लेव २०२६' परिषदेत डॉ. आशिया बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा नियोजन अधिकारी तथा परिषदेचे सदस्य सचिव दीपक दातीर, रमेश कासार, रोटरीचे डॉ. विनोद मोरे, क्षितिज झावरे, मर्लिन इलिशा, एव्हॅंजेलिन एलिशा, महेश गोपाळकृष्णन, तुषार देशमुख, सारिका मोरे, सुजाता उबाळे, हिरा मोतीयानी आदी उपस्थित होते. ​जि...

अॅड महेश शेडाळे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार पदी तर अॅड गजानन फुंदे अहिल्यानगर जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार पदी महेश शेडाळे  तर गजानन फुंदे अहिल्यानगर जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी यांची नियुक्ती  करण्यात आली असून, त्यांना दक्ष पोलीस मित्र संस्थेचे अध्यक्ष संस्थापक शहादेव मुंगसे  यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे,प्रहार संघटनेचे  परसराम जगधने, पत्रकार शिवहारी म्हस्के रफिक शेख आदी उपस्थित होते. यावेळी महेश शेडाळे राष्ट्रीय कायदेशीर सल्लगार पदी तर गजानन फुदे यांची अहमदनगर जिल्हा कायदेशीर सल्लगार पदी निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमास पोलीस यंत्रनेस मदत करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे यांनी सांगितले, शेवटी परसराम जगधने यांनीं उपस्थितांचे आभार मानले.

सोलर पी. व्ही. इन्स्टॉलेशन हेल्पर’ या नावीन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षणाचा बंद्यांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया.

इमेज
​अहिल्यानगर ( प्रतिनिधी) : जिल्हा कारागृहातील बंद्यांच्या पुनर्वसन व स्वावलंबनाच्या दृष्टीने कौशल्यावर आधारित ‘सोलर पी. व्ही. इन्स्टॉलेशन हेल्पर’ हा नावीन्यपूर्ण प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला असून, या प्रशिक्षणाचा अधिकाधिक बंद्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. ​जिल्हा कारागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्थान, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाची तुकडी सुरू करण्यात आली, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ​यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संतोष कवार, दुर्गा एंटरप्राईजेसचे प्रसाद तोडमल आदी मान्यवर उपस्थित होते. ​जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले , जिल्ह्यात सौरऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. प्रशिक्षणादरम्यान विविध वित्तीय विकास महामंडळांमार्फत व्यवसायासाठी आर्थिक साहाय्य कसे प्राप्त करता येईल, याबाबत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन कर...

*भोयरे पठार जि.प.शाळेतील बालचमुंनी भरवला आनंदी बाजार.*

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी जि. प. प्राथमिक शाळा भोयरे पठार येथे सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांच्या बालआनंद मेळाव्याचे अर्थात 'आनंदीबाजार' या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ माजी सैनिक - आनशाबापू उरमुडे तसेच अशोक मुठे - अध्यक्ष आजी माजी सैनिक संघटना भोयरे पठार यांनी केले.*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी सैनिक आनशाबापू उरमुडे होते. तसेच या कार्यक्रमासाठी मा .उपसरपंच श्री.राजेश बोरकर , सामाजिक कार्यकर्ते डॉ.अमोल टकले , माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री.बबन साठे , शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष श्री.विजय टकले व श्री.सीताराम केदार , व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.दादाभाऊ कावरे ,उपाध्यक्ष श्री.बाळू उरमुडे तसेच व्यवस्थापन समिती सदस्य व शाळेबद्दल नेहमीच आपुलकी ठेवणारे श्री.अशोक कदम, श्री. मनोहर गाढे, श्री. शाहरुख शेख, श्री. रमेश उरमुडे , श्री. शिवाजी मुठे, श्री. अमोल उमाप , श्री. संदीप आंबेकर, श्री. संदीप उरमुडे, श्री.राजेंद्र आंबेकर ,भाग्योदय वि...

पळवे ग्रामपंचायतची ग्रामसभा ठरली वादळी. ग्रामपंचायत भक्षक की रक्षक...ग्रामस्थांचा आरोप ?

इमेज
  पारनेर (प्रतिनिधी) :-     मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील पळवे बुद्रुक येथे मंगळवारी (दि. २३) झालेली ग्रामसभा प्रचंड वादळी ठरली. याबाबत विविध नामांकित वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ग्रामस्थांकडून घेतलेल्या सह्यांचा वापर थेट 'खडी क्रेशर' प्रकल्पासाठी ना हरकत दाखला (NOC) मिळवण्याकरीता करण्यात आल्याचा  धक्कादायक प्रकार सभेत उघडकीस आला असल्याची माहिती मिळाली.        प्राप्त माहितीनुसार या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवण्यात येत असून, सुमारे ९५ टक्क्‌यांहून अधिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार, माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीत ग्रामपंचायतीने खडी क्रेशर मालकाला दिलेल्या एनओसीसोबत पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी घेतलेल्या सह्यांचे कागदपत्र जोडल्याचे स्पष्ट झाले असल्याचे तसेच. आम्ही आमच्या पिकांच्या नुकसानीसाठी सह्या केल्या होत्या, क्रेशर प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे, अशी संतप्त प्रति...

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेली बॉम्बची धमकी अफवाच.

इमेज
  ​अहिल्यानगर (प्रतिनिधी: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज सकाळी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने केलेल्या सखोल तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज आता पूर्णपणे सुरळीत सुरू झाले आहे. ​आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने पोलीस विभागाला याची माहिती दिली. खबरदारीचा उपाय व‌ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालय परिसर रिकामा केला. बॉम्ब शोधक पथकातील 'लुसी' व 'जंजीर' या श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक बॉम्ब शोधक यंत्रणेद्वारे कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्व मजले, जिने, लिफ्ट, पार्किंग व संपूर्ण परिसराचा समावेश होता. या शोधमोहिमेत अग्निशमन दल व एसआयडी (SID) पथकाचेही सहकार्य लाभले.  ​या सखोल शोधमोहिमेत कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत. परिसराची सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर दुपारी कार्यालयाचे दैनंदिन कामकाज पुन्हा पूर्ववत सु...

रस्त्यावरच पोलांचे साम्राज्य ! सोलर प्रकल्पाच्या बेफिकीर कामामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत; ग्रामस्थांचा संताप ?

इमेज
चिचोंडी पाटील/ बाळासाहेब गदादे:- मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सोलर कंपनीने प्रकल्पातील लाईनसाठी ग्रामीण रस्त्यालगतच पोल उभारण्याचा गोंधळ उडवणारा पद्धतशीर उपद्व्याप सुरू केले असून, शेतकरी आणि ग्रामस्थ या कामावर संतप्त आहेत. ग्रामीण भागातील साधे, सोयीचे आणि दैनंदिन वाहतुकीसाठी आवश्यक रस्ते हे आता लोखंडी पोलांनी व्यापले असून, जनावरांची ने-आण, ट्रॅक्टरची वाहतूक, पीक काढणी, औजारे वाहतूक — अशा सर्व व्यवहारात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामस्थ या परिस्थितीवर संताप व्यक्त करत म्हणत आहेत की, “हा रस्ता आहे की सोलर प्रकल्पाचा प्लॉट? गावाच्या जीवनवाहिनीवरच हा प्रकल्प कब्जा करत आहे.” या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे सोलर कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) अधिकृत परवानगी घेतली आहे की नाही. या संदर्भात प्रशासनाकडून कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांचा संशय अधिकच गडद होत आहे. गावकऱ्यांचे मत आहे की हा प्रकार तपासा...

सबस्टेशनला कनेक्शन नाही; तरीही मीटर बसले! सांडवे सौर प्रकल्पात अनियमिततेचा वास; शेतकऱ्यांचा रोष ?

इमेज
चिचोंडी पाटील/बाळासाहेब गदादे:- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपकेंद्राच्या हद्दीत सांडवे गावातून सुरु असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लाईन जोडणीच्या कामावर गंभीर शंका आणि अनियमिततेची काळी छाया पसरत आहे. अजून कोणत्याही प्रकारची वीज जोडणी न झालेली असतानाच ‘इन व आउट गोईंग’ मीटर सबस्टेशनमध्ये बसवण्यात आल्याने गावकऱ्यांच्या मनात संशयाची धग पेट घेत आहे. उपकेंद्राशी कोणताही प्रत्यक्ष कनेक्शन नसताना मीटर बसवण्याची इतकी घाई कशासाठी? मीटर कोणत्या ऊर्जेचे मोजमाप करणार? ही कारवाई तांत्रिकदृष्ट्या अशक्य असतांनाच केली गेल्याने प्रकल्पात काहीतरी ‘गोलमाल’ किंवा कागदोपत्री दाखवण्यासाठीची बनावट कार्यवाही सुरू असल्याची शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तसेच या प्रकल्पाचे आणखी एक गंभीर रूप म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांची परवानगी न घेता पोल रोवणे. काही जमिनमालकांनी या कामाला तोंडी विरोध दर्शवला; तरीदेखील त्यांच्या हरकतीकडे दुर्लक्ष करून प्रकल्प व्यवस्थापनाने जबरदस्तीने पोल उभारण्यात आले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी या प्रकाराबाबत लेखी तक्रार हि केली परंतु तक्रारीनंतरही कोणताही अधिकारी शेतात पाहणीस आला नाही...

कामरगाव येथील मातोश्री सिताबाई काजळे कन्या छात्रालयात मुलींना गणवेश वाटप.

इमेज
  अहिल्यानगर/प्रतिनिधी:-  श्री सद्‌गुरु सेवा मंडळ पुणे संचलित, मातोश्री सिताबाई काजळे कन्या छात्रालय कामरगाव येथील मुलींच्या वसतिगृहात कै.हभप बबन महाराज कळसकर यांचा 32 वा पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृह उभारणीकरीता महत्वाचे योगदान दिलेले मा.आरोग्य अधिकारी बापूसाहेब शेळके हे होते.  तर सामाजिक कार्यकर्ते हाबू शिंदे, मा.सरपंच तुकाराम कातोरे गुरुजी, मा.मुख्याध्यापक सुदाम ठोकळ, सेवानिवृत्त  शिक्षक साहेबराव ठोकळ, पत्रकार हेमंत साठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. वसतिगृहातील मुलींनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच कै ह.भ.प. बबन महाराज कळसकर यांच्या कार्याबददल माहिती दिली.  मान्यवरांनी या कार्यक्रमप्रसंगी आपल्या मनोगतातून वस‌तिगृहाकरिता मदत करण्याचे आश्वासन दिले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते वसतिगृहातील मुलींना व कर्मचाऱ्यांना संस्थेकडून गणवेश वाटप करण्यात आले. वसतिगृहाच्या अधिक्षिका श्रीमती फुलाबाई कानवडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे मार्गदर...

एआय आधारित बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर जिल्हा व्याघ्र कक्ष समितीची बैठक संपन्न

इमेज
  अहिल्यानगर/ प्रतिनिधी:दि. २८ – जिल्ह्यात वाढत्या मानव–बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआय आधारीत बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या. ते जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत बोलत होते. बैठकीस उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, समितीचे सदस्य सचिव व विभागीय वनअधिकारी (दक्षता) नाशिक डॉ. अजित साजणे, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, गणेश मिसाळ, सौ. अश्विनी दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, दादासाहेब वाघुलकर, मानद वन्यजीव रक्षक मंदार साबळे, पोलीस निरीक्षक सुधाकर कुहाडे व किरणकुमार कबाडी (स्थानिक गुन्हे शाखा) आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री. घार्गे म्हणाले, वनविभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पोलिसांकडून शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मानव–बिबट्या संघर्षाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांच्या विविध गावांतील व्हॉट्सअ‍ॅप गटांमध्ये वनअधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. वन्यप्राणी अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखणे, तसेच अस्...

सुप्यात वाहतूक कोंडीचा कहर ! अहिल्यानगर- पुणे महामार्गावर आपत्कालीन सेवांवर परिणाम.

इमेज
  अहिल्यानगर  (प्रतिनिधी): अहिल्यानगर–पुणे महामार्गावरील सुपा परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे. सुपा गाव ते टोल नाका परिसरापर्यंत वाहतुकीची सततची कोंडी आता नागरिक, प्रवासी, उद्योगधंदे तसेच रुग्णवाहिकांसाठी मोठ्या संकटाचे रूप घेत आहे. *प्रमुख कारणे : रस्त्यावर पार्किंग व अतिक्रमण.* सुपा बाजारपेठ परिसरात प्रसिद्ध बेकरी पदार्थांसाठी वाहनांची मोठी गर्दी होत असून अनेक बेशिस्त वाहन चालक रस्त्यातच गाड्या उभ्या करतात. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही मिनिटांतच ठप्प होते. मध्यंतरी अहिल्यानगर–पुणे महामार्गालगत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. *एमआयडीसी पोलिस स्टेशनकडे नागरिकांचा आक्षेप.* सुपा एमआयडीसी पोलिसांनी या वाहतूक कोंडीवर ठोस भूमिका घेत नसल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गावर सतत वाढणाऱ्या वाहनसंख्येचा विचार करता येथील वाहतूक नियोजन अपुरे असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. आपत्कालीन सेवा धोक्यात आज (दि. २७ मे) एका प्रवाशाने ११२ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितल्यानंतर...

श्री क्षेत्र दत्त देवस्थान कामरगाव येथे संगीतमय तुलसी रामायण सोहळा व नाथभक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन. ; आयोजक श्री.बापू माऊली ठोकळ यांचे नागरीकांना आवाहन.

इमेज
अहिल्यानगर/ प्रतिनिधी:- तालुक्यातील कामरगाव येथे श्री. दत्त देवस्थान या ठिकाणी  सं गीतमय तुलसीरामायण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र कामरगाव येथे संगीतमय तुलसीरामायण कथा सोहळा मोठ्या भक्तीभावाने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री दत्त देवस्थानचे मठाधिपती श्री.बापू माऊली ठोकळ यांनी दिली. दिनांक २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा भव्य अध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमादरम्यान दररोज विविध आध्यात्मिक विषयासह संगीतमय तुलसी रामायण कथाकथन तसेच रामभक्तीने परिपूर्ण धार्मिक उपक्रमांचे तसेच रोज भाविकांसाठी प्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि १ डिसेंबर २०२५ रोजी नाथभक्त तथा सुप्रसिद्ध नाथगायक आकाश शिंदे यांचा नाथ भक्ती गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांसाठी आयोजक बापू माऊली ठोकळ व आयोजक मंडळाने सर्व नागरिकांना, भाविकांना व सांस्कृतिक रसिकांना उपस्थित राहून हा अध्यात्मिक सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. आयोजक श्री.बापू (माऊली) ठोकळ यांच्या वतीने सांगण्यात आले की, “रामकथा ही भक्ती, ज्ञान आणि संस्कारांचे प्रे...

मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामरगाव येथे महायुतीच्या वतीने वटवृक्ष लागवड.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव येथे मा.खासदार तथा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीच्या वतीने वटवृक्ष लागवड करण्यात आली. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे यांनी दिली.        मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीच्या वतीने कामरगाव येथील स्मशानभूमी परिसरात वटवृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित जेष्ठ नेते तथा प्रगतीशील शेतकरी गोरख साठे, सामाजिक कार्यकर्ते तथा मा.सरपंच तुकाराम कातोरे, सरपंच संदीप ढवळे,जेष्ठ नेते श्यामराव आंधळे, युवा नेते संदीप लष्करे, सोसायटी मा.चेअरमन अनिल आंधळे, मा.चेअरमन शिवाजी साठे, सुदाम ठोकळ सर,  व्हाईस चेअरमन राजेंद्र राजगुरू, भाऊ राजगुरू,  ग्रामपंचायत सदस्य राजू पठाण,लक्ष्मण ठोकळ, प्रदीप साठे, वसीम शेख,  इम्रान शेख, संदीप भिंगारदिवे, भिमराव सातपुते, योगेश ठोकळ, संदीप पाडेकर, ठोकळ मेजर, अमोल गुंजाळ, संतोष साठे,  सौरभ सातपुते, सोहम कुसळकर, यांच्या...

स्नेहबंध’च्या उपक्रमातून समाज जनजागृतीला नवे बळ. सामाजिक कार्याबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचा सीईओ पल्लवी विजयवंशी यांच्या हस्ते सन्मान

इमेज
{स्नेहबंध'चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सन्मान करताना सीईओ पल्लवी विजयवंशी, सपोनि. जगदीश मुलगीर.} अहिल्यानगर (हेमंत साठे):- समाजातील विविध घटकांमध्ये जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशन राबवत असलेल्या उपक्रमातून समाज जनजागृतीला नवे बळ मिळते, असे प्रतिपादन छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनी केले. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजयवंशी यांच्या हस्ते शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, श्री रोकडेश्वर मंदिराचे अध्यक्ष नंदकुमार झंवर, हरदिन मॉर्निंगचे अध्यक्ष संजय सपकाळ, माजी प्राचार्य एकनाथ जगताप, योगगुरू रामचंद्र लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.  सीईओ विजयवंशी म्हणाल्या, “सामाजिक कार्यात सातत्य, संवेदनशीलता आणि लोकाभिमुखता या गुणांनी स्नेहबंधचे कार्य वेगळेपण जपते. डॉ. उद्धव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणारे उपक्रम प्रेरणादायी आहेत. डॉ. उद्धव श...

जिल्हा परिषद शाळा ढोकी येथे बिबटयाविषयी जनजागृती.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-  ग्रामपंचायत ढोकी येथे वनसंरक्षक अधिकारी श्रीमती ज्योती दाभाडे या बिबट्यापासून आपले संरक्षण कसे करावे ? यासाठी जनजागृती करण्यासाठी ग्रामसभेत आल्या असता जि.प शाळेतील शिक्षक प्रमोद झावरे व प्रशांत ठुबे यांनी शाळेतही विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहिती द्यावी अशी विनंती केली असता त्यांनी शाळेत येऊन बिबटया जनजागृती संदर्भात माहिती दिली. तसेच पर्यावरण संरक्षणासंदर्भात मुलांना माहिती दिली.  ही माहिती देत असताना  मुलांनी देखील संवाद साधत या संदर्भात काही प्रश्न विचारावेत असे आवाहन केले. आणि त्यातूनच रंगला मुलाखतीचा कार्यक्रम यामध्ये सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी वनसंरक्षक यांना वेगवेगळे प्रश्न विचारून निसर्गा बद्दलचे कुतूहल जागृत केले. तुमचे शिक्षण कुठे झाले ?तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? तुम्हाला हे क्षेत्र आवडतं का ?तुम्हाला कोणता पक्षी आवडतो ?तुमचा एक  जंगलातील अनुभव सांगा ? तसेच पिंजरे तुम्ही कोठे कोठे लावलेले आहेत? हे क्षेत्र तुम्हाला का आवडते? असे वेगवेगळे प्रश्न विचारून वनसंरक्षक दाभाडे मॅडम यांना विदयार्थ्यानी बोलते केले आणि त्यांनीही मुलां...

फॉलोअर