पोस्ट्स

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वंदे मातरम् रथाचे जल्लोषात स्वागत*

इमेज
  अहिल्यानगर (हेमंत साठे):- वंदे मातरम् गीत निर्मितीच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वंद्य वंदे मातरम्  या अभियानांतर्गत दिनांक 12 मार्च 2026 रोजी अहील्यानगर शहरातील हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालयात वंदे मातरम् रथाचे स्वागत उपमहापौर श्री.धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्री.मिलिंद सबनीस, आयोजन समितीचे अध्यक्ष श्री.सागर वैद्य, अधिसभा सदस्य श्री.कृष्णा भंडलकर,श्री.राहुल पाखरे,श्री.अमोल घोलप,सहायक कुलसचिव डॉ.अजय ठुबे,डॉ.शिवप्रसाद घालमे.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.माहेश्वरी गावित उपस्थित होते.यावेळी उपमहापौर श्री.धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम असल्याचा मंत्र दिला.श्री.सागर वैद्य यांनी अभियानाचा उद्देश व पार्श्वभूमी स्पष्ट केली.कार्यक्रमास हिंद सेवा मंडळाचे संस्था पदाधिकारी,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******************************************** 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त श...

जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया. ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे.

इमेज
अहिल्यानगर/प्रतिनिधी- जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्यामध्ये नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष पथकामार्फत अचानक तपासणी करावी आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. तसेच, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील एलपीजी गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी एम. के. चौधरी, बीपीसीएल कंपनीचे राजकुमार मिश्रा यांच्यासह संबंधित गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी व गॅस वितरक उपस्थित होते.   सध्या जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. नियमानुसार गॅस वितरण होत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच,...

दहिगाव येथे महाराजस्व शिबीर उत्साहात संपन्न . ; एप्रिल मध्ये नगर तालुक्यात जनता दरबार भरवणार -आ.विक्रमसिंह पाचपुते.

इमेज
अहिल्यानगर /प्रतिनिधी:- नगर तालुक्यातील  दहिगाव येथील श्री राम मंगल कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते,  कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रथम पुजन झाले तदनंतर जिल्हा परिषद शाळेतील मुलींकडून महाराष्ट्र गीतगायन करण्यात आले. केडगाव मंडल अधिकारी रुपाली टेमक यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या ठिकाणी महसूल विभागा अंतर्गत येणारा पुरवठा विभागातील कामे गोरगरीब जनतेचा जिव्हाळ्याचा विषय रेशनकार्ड मध्ये नाव कमी करणे , समाविष्ट करणे, रेशनिंग केवायसी करणे या विभागाचे पुरवठा अधिकारी शिवराज पवार यांच्यासह कर्मचारी जागेवर संबंधित प्रश्न मार्गी लावत होते. बांधकाम मंडळ सदर ठिकाणी नाव नोंदणी, नुतनीकरण बांधकाम जनजागृती कार्यक्रम काम बांधकाम  नोंदणी  सह जाग्यावर सदर प्रश्न निपटारा करत होते. जिल्हा रेशीम उद्योग कार्यलय अंतर्गत शेतकरी रेश्म उद्योग नावनोंदणी व्यवसाय मार्गदर्शन करणे, कृषी विभाग शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी शेतकरी पिएम किसन प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी...

तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य-- स.पो.नि. गणेश वारुळे

इमेज
. अहिल्यानगर (प्रतिनिधी):-  अहिल्यानगर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरणात जीवन जगता येईल यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे मत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी व्यक्त केले.  नुकताच वारुळे यांनी पदभार स्वीकारला त्यामुळे कामरगावचे मा. सरपंच तुकाराम कातोरे, स्व: गोपोनाथ मुंडे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजाभाऊ पोटे, पिंपळगाव कौडा येथील युवा नेतृत्व संदीप कोल्हे, संभाजी गोरे यांच्या शिष्ट मंडळाने पोलीस स्टेशनला जाऊन सत्कार केला. यावेळी बीट हवालदार श्रीम. कुंदा रेपाळे उपस्थित होत्या अशी माहिती तुकाराम कातोरे यांनी दिली.  सध्या तालुक्यात काही भागात लुटमाऱ्या, चोऱ्या, दरोडे अशा घटना घडत असतात. त्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. त्यानुसार अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात वाहने आडवून लुटमार करणाऱ्या एका टोळीला आठ दिवसापूर्वी जेरबंद केले आहे. या परिसरात अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यानुसार रात्रीच्या वेळी महामार्गावर फिरते गस्त पथक कार्यरत ठेवले जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला मदत करावी असे आवाहन...

शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक. प्रांत अधिकारी सुधीर पाटील.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):-  दि.05 शासनाच्या सर्वच योजना समाजहिताच्या असतात. त्या लोकाभिमुख करण्यासाठी व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी व पदाधिकार्‍यांनी संयुक्तपणे केले पाहिजे त्यासाठी जास्तीचा लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सुधीर पाटील यांनी व्यक्त केले.  *छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य* अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्व तयारी करण्यासाठी अहिल्यानगर तालुक्यातील चास मंडळातंर्गत अकरा गावातील सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, सेतूचालक, सामाजिक कार्यकर्ते, ग्राम महसूल अधिकारी, रेशन दुकानदार  यांची संयुक्त कार्यशाळा प्रांत अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चास येथे दिनांक 03/03/2026 रोजी आयोजित केली होती. प्रारंभी मंडळाधिकारी  वैशाली हिरवे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे यांनी प्रास्ताविक भाषणात अभियानाचा हेतू स्पष्ट केला.  09 एप्रिल 2026 रोजी होणार्‍या महाराजस्व अभियानात 7/12 उताऱ्यावरील मयत खातेदारांच्या वारस नोंदी करून तो उतारा जिवंत करणे, उताऱ्यावरून ...

परदेशात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्हयातील नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी.

इमेज
​अहिल्यानगर (प्रतिनिधी): - मध्यपूर्व व आखाती परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ​राज्य‌ व जिल्हा पातळीवरील मदत क्रमांक : आपत्कालीन परिस्थितीत किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राचे (२४x७) क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत : ​टोल फ्री क्रमांक : १०७० ​फोन : ०२२-२२०२७९९०, +९१-९३२१५८७१४३ ​ई- मेल : controlroom@gov.in ​तसेच, अहिल्यानगर...

अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’चा शुभारंभ. ; वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त. ; डिजिटल युगातही वाचन संस्कृती अबाधित, ग्रंथोत्सव ज्ञानपरंपरेचा सन्मान - शालिनीताई विखे पाटील.

इमेज
​अहिल्यानगर ( प्रतिनिधी) दि. २८ - ग्रंथांना आपण ‘गुरू’ची उपमा देतो. जसा गुरू शिष्याला ज्ञानाने समृद्ध करतो, तसेच ग्रंथ वाचकाला वैचारिक व बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करतात. डिजिटल क्रांतीच्या युगात काळ बदलत असला तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, ती नव्या माध्यमांतून अधिक व्यापक होईल, असा विश्वास शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून समाजातील सर्व घटकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ​प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती विखे पाटील बोलत होत्या. ​यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे, सरपंच कल्पना मैड, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहायक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलूलकर, प्रा. गणेश भगत, चंद्रकांत पालवे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्य राम पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती....

नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंचे फुलांच्या वर्षावात स्वागत -साकत येथे ग्रामस्थांनी काढली भव्य मिरवणूक. ;

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-   साकत खुर्द (ता. नगर) येथील  सुभाष पवार,   सुभाष शिंदे, मोहनतात्या चितळकर या  वारकऱ्यांनी पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार व स्वागत करण्यात आले.  पायी  हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास करत चार महिन्याच्या कालावधीत   कालावधीत त्यांनी दररोज किमान दहा ते पंधरा किलोमीटरचे अंतर पार करत आपली परिक्रमा यशस्वी पूर्ण केली. परिक्रमेच्या दरम्यान त्यांनी मार्गावरील विविध मंदिरे, आश्रम व देवस्थाने यांचे दर्शन घेतले. हा प्रवास जंगल भागातून झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऊन, वारा, थंडी तसेच शारीरिक कष्ट असूनही त्यांनी कोणतीही तक्रार न करता अत्यंत श्रद्धा, संयम व आत्मविश्वासाने हा खडतर प्रवास पूर्ण केला. चार महिन्याची खडतर परिक्रमा पूर्ण करून परतीचा प्रवास  करून साकतखुर्द येथे त्यांचे गुरुवारी ( दि. २६)  आगमन झाले. आगमन होताच ग्रामस्थांनी तसेच नातेवाईकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच फुलांचा वर्षाव करत त्यांचे जल्लोषात स्वागत  केले. यावेळी त्यांच...

लेखक सासवडे यांना राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

इमेज
अहिल्यानगर: अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत, साहित्योत्सव अंतर्गत राज्यस्तरीय खुली साहित्य लेखन स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. साहित्य पाठविण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत दिलेली होती. ही स्पर्धा 20, 21, 22 फेब्रुवारी 2026 अशा तीन दिवसात पार पडली. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून लेखक, कवी, नाट्यछटाकार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता.        साहित्योत्सवाच्या कथा लेखन स्पर्धेत आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावचे लेखक अजिनाथ सासवडे यांच्या "मेटे मामा" या कथेसाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असून त्याचे वितरण लवकरच करण्यात येईल. लेखक अजिनाथ सासवडे यांना यापूर्वी देखील अनेक राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांचे सुखाचा शोध नावाचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. ******************************************** 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅन...

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .

इमेज
अहिल्यानगर( प्रतिनिधी):- तालुक्यातील गुन्हेगारीला चाप लावण्याकरिता नव्याने रूजू झालेले नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे व त्यांच्या टीमने कारवाईचा धडाका लावल्याचे दिसून येत असून, नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दि.२१/०२/२०२६ रोजी कोथरुळ, ता. माजलगाव जि. बीड येथुन इसम नामे-बालासाहेब काशीनाथ कदम व त्यांचा साथीदार पंकज श्रीराम कदम असे स्वीफ्ट कार नं- MH १२ UM २२४८  या कारने पुणे येथे त्यांचे भावास भेटण्यासाठी जात असताना दि-२२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.३० मि. सुमारास  ते कामरगाव शिवारातील हाँटेल गुरुदत्त हाँटेलचे जवळ गाडी रोडचे बाजूला घेवुन थांबले असता. तेथे चार अनोळखी इसमांनी हातात कोयते घेवून येत फिर्यादी व साक्षीदार यांच्या गळ्याला लावले. व फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांना त्यांचे स्विफ्ट गाडीमध्ये बसवून फिर्यादी व साक्षीदार  यांना नगरकडे नेत असताना स्विफ्ट कार व लक्झरीचा अपघात झाला. सदर आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांचे १८,०००/- रुपये रोख, ५०००० रुपये ऑनलाईन व ४७,००० हजार रुपये किमतीचे मोबाईल, चार्जर, जर्किंग असा एकुण १,१५,००००...

भोयरे पठार जि.प. शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. कला आणि संस्कृतीचा अविस्मरणीय मिलाफ.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा भोयरेपठार येथे "शाळेला गावाचा आधार , गावाला शाळेचा अभिमान" या ब्रीदवाक्यानुसार शिवजयंतीचे औचित्य साधत वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उदघाटन प्रसंगी कोल्हे साहेब  मार्केट कमिटी, संचालक राजू शेठ आंबेकर, सरपंच बाबाजी टकले, उपसरपंच राजेश बोरकर, उद्योजक किशोर शेठ कदम, मेजर अशोक मुठे, गणेश शेठ मुठे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाभाऊ कावरे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छावा गीतातील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून उपस्थितांच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत , लोकनृत्य व सामाजिक संदेश देणाऱ्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे युवा नेते प्रतिकदादा शेळके यांनी शाळेला आवश्यक असणारी साऊंड सिस्टीम विद्यार...

शेतकऱ्याच्या शेतातील संत्रा चोरणारा काही तासात गजाआड ! स.पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या टीमची धडक कारवाई.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- : मिळालेल्या माहितीनुसार दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दशमीगव्हाण तालुका- जिल्हा अहिल्यानगर गावच्या शिवारात शेतकरी पांडुरंग मस्के राहणार उक्कडगाव यांनी त्यांच्या संत्र्यांचे शेतातील संत्रा विक्री करता येण्यासाठी त्यांनी शेतात ११० मोकळे कॅरेट ठेवले होते व ते २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजण्यास सुमारास शेतात संत्र काढण्यासाठी गेले असता तेथे १२ मोकळे कॅरेट शिल्लक होते उर्वरित २८ कॅरेट संत्र्याचे झाडावरील फळे दिसले नाहीत तेव्हा त्यांना शेतात टेम्पोचे टायर मार्क दिसल्याने त्यांना त्यांच्या शेतातील संत्रा कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री झाली त्या अनुषंगाने त्यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनला १२०००० (एक लाख वीस हजार रुपये ) किमतीचा संत्रा व ४९००( चार हजार नऊशे रुपये) किमतीचे कॅरेट चोरून नेल्याची फिरत देण्याकरता हजर झाले सदर अनुषंगाने नगर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 105/ 2026 बी एन एस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस...

*नगर तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ.* *चिचोंडी पाटील व नारायणडोहोत बेदम मारहाण व रक्तरंजित दरोड्याचा थरार.*.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी)– मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात रविवारी (दि.२२) पहाटे दरोडेखोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. चिचोंडी पाटील आणि नारायणडोह या गावांमध्ये दीड ते दोन तासांच्या अंतराने अज्ञात दरोडे खोरांनी कोयते, चाकू, लोखंडी कटावणी च्या सहाय्याने दोन घरांवर दरोडा टाकत घरातील व्यक्तींना बेदम मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने, रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एकाच रात्रीत पडलेल्या या दोन दरोड्यांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरोड्याची पहिली घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या शिवारात नगर- जामखेड रोडवर सालेवडगाव फाटा येथे असलेल्या पवार वस्तीवर घडली. या ठिकाणी असलेल्या सुदाम पवार (वय ७०) आणि त्यांची पत्नी पदम पवार (वय ६०) हे वृद्ध दाम्पत्य रात्री घरात झोपलेले असताना साधारण १२.३० च्या सुमाराल अज्ञात दरोडेखोर तेथे आले. त्यांनी कटावणीच्या साहाय्याने दरवाजा उघडला. घरात उचकापाचक करत असताना सुदाम पवार यांना जाग आली. तेव्हा त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या पत्नी पदद्म पवार यांना ही मारहाण करत दरोडेखोरांनी घरा...

माझी वसुंधरा ४.० व ५.० अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग दोन वर्षे पुरस्कार ; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते ११ कोटींचे पुरस्कार महानगरपालिकेला प्रदान. ; शहरासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे चांगली कामगिरी : आयुक्त यशवंत डांगे .

इमेज
  अहिल्यानगर( प्रतिनिधी):-  - राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये पुरस्कार मिळाला आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला ५ कोटींचे तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच, मागील वर्षी माझी वसुंधरा ४.० अभियानातही राज्यात ६ कोटींचा दुसरा पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही ११ कोटींच्या पुरस्कारांचे वितरण राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव व आयुक्त यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई येथील कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. माझी वसुंधरा अभियानात गेली दोन वर्षे महानगरपालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळवला. भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या. शहरात या विषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. म...

खंडणी मागणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड; उद्योजकांकडून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचा सत्कार.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):-                मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजकांना खंडणी मागीतल्याची तक्रार उदयोजकांनी थेट पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली होती. पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करत खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उनवणे, राजेश पाटील या संशयित आरोपींची एम आय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व त्यांच्या टीमने धिंड काढली.                     याप्रकरणी आमी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा आज (ता. १९) सत्कार करण्यात आला. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे. यावेळी एमआयडीसीचे प्रभारी अधिकारी माणिक चौधरी उपस्थित होते. ********************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅन...

कामरगाव मधील ज्येष्ठ नागरीक चंद्रकांत साठे यांचे वृद्धापकाळाने निधन. दशक्रिया विधी १८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी होणार.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-  कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथील जेष्ठ नागरीक चंद्रकांत कान्हू साठे (वय ७९) यांचे ९ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने दुखः द निधन झाले. गावातील विविध कार्यकारी  सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात त्यांनी सेल्समन म्हणून ४० वर्ष उत्कृष्ट  काम केले. गावातील सामाजिक उपक्रमात त्यांचे विशेष योगदान होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  माजी सैनिक अशोकराव साठे, व्यवसायिक भाऊसाहेब साठे,  उपक्रमशील शिक्षक संतोष साठे यांचे ते वडील होते. गावातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक उपक्रमात त्यांच्या परिवाराचा मोलाचा सहभाग असतो. कामरगाव येथील अमरधाममध्ये दि १८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी सकाळी ८ वा त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे. ******************************************** 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा... 👇🏻 https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

डॉ राजु म्हस्के महाराष्ट्र शासन राज्य गो सेवा आयोग पुरस्काराने सन्मानित.

इमेज
        अहिल्यानगर (प्रतिनिधी) :-  दि.14  फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी महाराष्ट्र शासना गो सेवा आयोग पुणे तर्फे सन २०२५-२६ मध्ये आयोजित महाराष्ट्र शुध्द देशी गोवंश सन्मान योजने अंतर्गत ता. जि अहिल्यानगर मधील दहिगाव गावचे प्रगतशील शेतकरी डॉ.राजु मुकुंदराव म्हस्के व प्रमिला प्रकाश म्हस्के  यांनी सादर केलेल्या नामांकनास राज्यस्तरीय पुरस्कार गोवंश-प्रक्षेत्र विभागातून निवडीद्वारे नामदार पंकजा ताई मुंडे (पशु संवर्धन मंत्री) यांच्या हस्ते तसेच राज्यमंत्री  श्री शेखर मुंदडा (अध्यक्ष महाराष्ट्र गो सेवा आयोग)यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला व गो सेवा आयोगाचा श्रेष्ठ राजदुत म्हणून घोषित करण्यात आले. ********************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा... 👇🏻 https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

इमेज
  अहिल्यानगर (प्रतिनिधी) :  कामरगाव ता. अहिल्यानगर परिसरात एका बंद घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचे दागिने चोरून लंपास केल्याची घटना घडली आहे.  सदर चोरीच्या घटनेत खरेदी करतेवेळेची अंदाजे किंमत रु ८६०००/-  परंतु सदयस्थितीतील मार्केट भावाप्रमाणे अंदाजे किंमत ६०००००/ (सहा लाख रुपये) किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे असे मिळालेल्या माहितीनुसार समजते. याबाबत फिर्यादी प्राध्यापक डॉ.अशोक विठ्ठल ठोकळ (वय ४९, रा. मुलानवस्ती, कामरगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की. कामरगाव येथील प्राध्यापक डॉ. अशोक ठोकळ एका नामांकित महाविदयालयात कार्यरत आहेत. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रात सण झाल्यानंतर त्यांच्या पत्नी यांनी दागिने घरातील कपाटाखाली ठेवले होते. परंतु १० फेब्रुवारी रोजी घरात झाडलोट करताना दागिने नसल्याचे आढळले. त्यांनी डॉ.अशोक ठोकळ यांना फोनद्वारे सदर घटना कळवली. त्यानंतर त्यान...

अहिल्यानगरच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा 'स्नेहबंध' तर्फे सत्कार

इमेज
  (अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा शाल व वृक्ष देऊन सत्कार करताना 'स्नेहबंध'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.) अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी महापौर सौ. गाडे यांना शाल व वृक्ष देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर अधिक स्वच्छ, हरित व प्रगत शहर घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाच्या माध्यमातून हा सत्कार अधिक अर्थपूर्ण ठरला. महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकाभिमुख उपक्रम, विकासकामे व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी सांगितले. ********************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास...

माझी एक आठवण...महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व स्व.अजितदादांबद्दल...🙏

इमेज
         बारामती येथे २२ ते २४ डिसेंबर २०१२ या कालावधीत ९३ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. हे संमेलन प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी बारामतीची रंगीत विद्युत रोषणाई आणि भव्य तयारी लक्षवेधी ठरली होती. यासाठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष त्यावेळी नुकतेच परत सिंचन घोट्याळ्यात आरोप झाल्यावर राजीनामा दिल्यानंतर निर्दोष सुटल्यावर ७ डिसेंबर ला परत नव्याने  उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा पवार हे होते. तर उदघाटक म्हणून केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब हे होते व प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे होते . साहित्य, नाट्य याची मला आवड असल्याने या कार्यक्रमासाठी जायचे असे  मी व आमचे मित्र रमेश पवार सर, (बीड ) यांनी ठरवले . २२ डिसेंबरला शनिवार होता, शाळा सुटल्यावर नगर एसटी बस स्टँडवरुन एसटीने डायरेक्ट रात्रीचा प्रवास करून २३ डिसेंबरला रविवारी  बारामती गाठले. पहाटेच एसटी स्टँडवरच सर्व प्रातःविधी, अंघोळ वगैरे उरकून बारामती येथील मोरोपंत मंडपात नाटय संमे...

फॉलोअर